आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख

०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.
०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेले योगदान महत्त्वाचे आहे .यातील विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श यांनी संस्कृत , बंगाली , हिंदी , मराठी या भारतीय भाषांचा अभ्यास केला.

०३. फेलिक्स कँरे यांनी बंगाली भाषेत विश्वकोष लिहिला. वॉर्ड यांनी ‘बायबल’ चा बंगाली भाषेत अनुवाद प्रकाशित केला. साहित्यिक मार्शमन यांनी भारताचा इतिहास , भुगोल , खगोलशास्रावर पुस्तके लिहिली.

०४. कोलकाता ढाका चितगाव येथे इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या .त्यात ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासावर भर होता . १८१८ साली श्रीरामपूर येथे बाप्टिस्ट मिशन कॉलेज सुरू केले.

०५. इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतात अनेक विद्यालये स्थापन केली. १७८१ साली जनरल वॉरन हेस्टींगने कलकत्ता मदरसाची स्थापना केली. १७९१ साली इंग्रज रेसिडंट जोनाथन डंकन याने बनारस येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केले. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी वॉरन हेस्टींगच्या मदतीने १७८४ साली बंगाल एशियटीक सोसायटी स्थापन केली

०६. इंग्लंड मधील चार्लस ग्रँड व विल्यम व विल्यम विल्बरफोर्स या इन्व्हेन्जेलिकल संप्रदायाच्या अनुयायांनी भारतात कंपनी सरकारला मिशनरीद्वारे मिशनरी कार्यास परवानगी देण्याची मागणी केली .

०७. त्यानुसार १८१३ चा कायदा करण्यात आला. भारतात पाश्चात्त्य ज्ञानाचा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनरी वर्गाला परवानगी देण्याची तरतुद १८१३ च्या सनदी कायद्यात दिली.

शिक्षण विषयक धोरण

०१. १८२३ साली ‘ कोलकाता स्कूल सोसायटी ‘ व ‘ कोलकाता स्कूल बुक सोसायटी ‘ यांना लॉर्ड हेस्टींग्जने अनुदान दिले . कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ची स्थापना केली गेली.

०२. १८२४ साली संस्कृत महाविद्यालय कोलकाता येथे स्थापन केले गेले. या काळात ‘ओरिएंटँलिस्ट‘ गटातील होरेस विल्सन, विल्यम जोन्स, प्रिन्सेप यांनी भारतातील प्रचलित शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन दिले तर ‘अँग्लिसिस्ट’ गटातील बिशप हेबर, अलेक्झांडर डफ, चार्लस ट्रिव्हेलियन सारखे इंग्रज अधिकारी व राजा राम मोहन रॉय यासारख्या भारतीय समाज सुधारकांनी पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला

०३. १८३४ साली लॉर्ड मेकॉलेची गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलातील विधी सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्याने इंग्रजी शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन द्यावे, शिक्षणासाठी मंजुर झालेली रक्कम पौर्वात्य शिक्षणावर खर्च केली जाऊ नये अशी शिफारस केली. ७ मार्च १८३५ मेकॉलेने मांडलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

०४. १८३९ साली आँक्लंडने मेकॉलेच्या प्रस्तावात बदल करुन रकमेचा काही भाग पौर्वात्य शिक्षणावर खर्च करण्याचा तसेच दर महिन्याला एशिॲटीक सोसायटीला ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला

०५. १८४२ साली ‘कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन’ ची जागा ‘कौन्सिल आँफ एज्युकेशन’ने घेतली.

०६. १८४३ ते १८५५ या काळात बंगाल मधील सरकारी नियंत्रणाखालील शाळांची संख्या २८ वरुन १५१ पर्यंत गेली .

०७. १८५४ साली प्राथमिक व उच्च शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन दिले . नियामक मंडळाचा अध्यक्ष सर चार्लस वुड याने १८५४ मध्ये शिक्षण विषयक खलिता तयार केला.

स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक आयोग

०१. चार्टर अ‍ॅक्ट हा १८१३ साली आला. यात शिक्षण पाश्चिमात्य की पारंपरिक यावर वाद होता.

०२. लॉर्ड मेकॅलेचा जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली. याच अहवालाला लॉर्ड बेंटिकने मान्यता दिली.

०३. १८५४ वूडचा खलिता या अहवालामध्ये सर चार्ल्स वूड यांनी पाश्चिमात्य ज्ञानावर भर द्यावा यावर शिफारस केली, तसेच मद्रास, कलकत्ता, मुंबई या विद्यापीठांची स्थापना झाली.

०४. १८८२ चा हंटर आयोगापुढेच महात्मा फुले यांनी आपली कैफियत मांडली. हंटर आयोग लॉर्ड रिपन यांनी मांडला. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षण, स्त्री शिक्षण यावर भर होता.

०५. लॉर्ड कर्झन यांनी उच्च शिक्षणासाठी १९०२ भारतीय विद्यापीठ आयोग  हा आयोग मांडला. त्यांनी १९०४मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा मांडलेला.

०६. १९१७ सॅडलर आयोगाच्या सर मायकेल सॅडलर यांनी शिक्षणामध्ये विविध मार्गानी विकास कसा करावा याबाबत शिफारशी सुचावल्या.

०७. वर्धा शिक्षण योजना १९३७ या योजनचे अध्यक्ष डॉ. झाकीर हुसेन होते. तर वर्धा शिक्षणयोजनेची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. हीच योजना मुलोद्योगी शिक्षण, बेसिक शिक्षणपद्धती, नई तालीम या नावाने ओळखली जाते. यामध्ये स्वावलंबी शिक्षण, विद्यार्थी केंद्रीय शिक्षण, स्वाश्रयी शिक्षण, हस्तव्यवसाय शिक्षण, नतिक शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण व ७ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण होतं.