०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी ग्वालीयार टॅंक मैदान (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे कॉंग्रेसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. यावेळी गांधीजींनी ‘करा किंवा मरा’ हा संदेश दिला.
०३. या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना आझाद यांच्याकडे होते. ९ ऑगस्ट रोजी पहाटे इंग्रजाकडून नेत्यांची धरपकड करण्यात आली. गांधीजीना आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान करण्यात आले. व इतर कार्यकारिणीच्या सदस्यांना अहमदनगर तुरूंगात (नगर जिल्ह्यातील अष्टकोनी भुईकोट किल्ला) डांबण्यात आले.
०१. या काळात देशभरात अनेक ठिकाणी प्रती सरकारे स्थापन करण्यात आली. नाना पाटील यांनी सातारा (महाराष्ट्र) येथे प्रति सरकार स्थापन केले. यासोबतच तालचेर व बालासौर (ओरिसा), बलिया व आजमगड (उत्तर प्रदेश), पूर्णिया व भागलपूर (बिहार), तसेच बंगालमध्ये तामलुक जातीया या नावाने मिदनापूर येथे प्रति सरकारे स्थापन झाली.
०२. या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली. सुरूवातीला याचा शहरी भागात अधिक जोर होता नंतर तो खेडयात पसरला.
०३. सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले तर ओळापूर येथे रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केले.
०४. या काळात भूमिगत चळवळी जोरात उभ्या राहिल्या. जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले व भूमिगत चळवळ सुरू झाली. मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया सुरु झाल्या. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेतृत्व केले.
०५. या आंदोलनात भारतीय संस्थानिकांनी इंग्रजांना मदत केली. तसेच सी. राजगोपालाचारी या सारखे मोठे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
०६. निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
०७. मात्र स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले. भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.
महाराष्ट्रातील आंदोलन
१९४२ च्या या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी, चिमूर, यावली, महाड, नगर, पाथर्डी, गारगोटी व नंदुरबार येथील लढेही महत्वपूर्ण ठरले. यावेळी कोल्हापूर व सांगली येथील जनतेनेही या नेत्यांना सहकार्य केले.
या दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी चिमूर हे गाव उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तेथील जनतेच्या आक्रमक विरोधामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
यावेळी नंदुरबार येथे शाळेवर तिरंगा ध्वज फडकविल्याने शिरीष कुमार या चिमुरड्याला आत्मबलिदान द्यावे लागले.
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनीही गुप्त सरकारी बातम्या आंदोलनकर्त्यांना पुरविल्या.
या आंदोलनकर्त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व साने गुरुजी यांच्या गीतांनी प्रोत्साहन दिले. “चलो जवानो करके दिखाओ, अब कहने के दिन बित गए”, “बलसागर भारत होवो”, “पत्थर सारे बम बनेंगे, भक्त बनेगी सेना” हे गीत त्या काळात प्रचंड प्रसिद्ध झाले.
त्यानंतर ब्रिटिशांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अटक केली.
०५. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या. अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही.
०९. ६ आठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती.
१०. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.